मुलाखत हा केंद्र लोकसेवा आयोग (यूपीएससी) आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेतील शेवटचा आणि महत्त्वपूर्ण टप्पा असतो. उमेदवाराचे अंतिम यादीतील स्थान निश्चित करण्यात हा टप्पा निर्णायक ठरू शकतो. म्हणूनच यात जास्तीत जास्त गुण मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवणे अत्यावश्यक आहे. यूपीएससीने २७५ गुणांसाठी तर एमपीएससीने १०० गुणांसाठी मुलाखतीचा अंतिम टप्पा निर्धारित केलेला आहे. लोकसेवा आयोगाने मुलाखतीस व्यक्तिमत्त्व चाचणी असे संबोधले आहे. मुलाखतीचा हेतू उमेदवाराचे व्यक्तिमत्त्व सनदी सेवा पदासाठी सक्षम आहे किंवा नाही याची तपासणी करणे होय.
यश प्रत्येकालाच हवं असतं, पण ते मिळवण्यासाठी योग्य दिशेने प्रयत्न करणंदेखील आवश्यक असतं. बरेचदा प्रयत्न करूनही यश पदरात पडत नाही. अशा वेळी पदरी निराशा येऊ शकते. पण त्यावेळी आपण केलेल्या चुकांचं निरीक्षण करून त्या चुका पुन्हा न करता अचूकपणे मार्गक्रमण केल्यास यशाची पायरी नक्कीच चढता येऊ शकते. यश मिळवण्यासाठी कुठलेही प्रयत्न करताना काही महत्त्वाच्या गोष्टी अवश्य लक्षात ठेवाव्यात.
जगाच्या पाठीवर कुठेही गेलोतरी बँक हि सापडणारच. आर्थिक क्षेत्रात बँकिंगचा महत्त्वाचा वाटा आहे. बदलत्या, खुल्या अर्थ-व्यवस्थेत, जागतिकीकरणाच्या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत बँकांचा तितकाच मौल्यवान सहभाग आहे. व्यापाराची..व्यवसायाची बदलती रूपं, देशा-देशांच्या सीमा पुसून आयात-निर्यातीला आलेला वेग, डॉलरपाठोपाठ युरोचे वाढते साम्राज्य, संगणक-इंटरनेटच्या माध्यमातून शीघ्र पेमेंट सिस्टिम, ई कॉमर्सच्या खांद्याला खांदा लावून उभं राहिलेलं ई-बँकिंग अशा सगळ्या घडामोडीत बँकिंग हे क्षेत्र व्यापक होते आहे
आज विद्याथ्र्यांना अद्ययावत विज्ञानतंत्र्, तंत्रज्ञान, शिक्षण-करिअरमधील प्रचंड स्पर्धा यासारख्या वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जावे लागते. ते पेलताना विद्याथ्र्यांच्या बुद्धिमत्ता आणि कौशल्याची कसोटी लागते. मुलाचा शिक्षणक्रम निवडण्याच्या वेळेस मुलाची भावनिक, सामाजिक, शारीरिक आणि बौद्धिक विकासाची पातळी पालकांना समजणे अधिकाधिक अवघड होत आहे
ज्यांना परीक्षेची खरोखर भीती वाटत नाही, अशा विद्याथ्र्यांमध्ये काही गुण प्रकर्षाने दिसतात. ते म्हणजे वेळेचे व्यवस्थापन, अभ्यासाचे नियोजन व सकारात्मक दृष्टिकोन या बाबी सर्वात महत्त्वाच्या असतात. या तिन्ही बाबी जन्मजात नसतात; परंतु प्रयत्न केल्यास त्या सहज आत्मसात करता येतात. त्यासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक या सर्वांच्या प्रयत्नांची गरज असते. कॉम्प्युटरमधील सर्व विद्यार्थ्याचा डाटा करप्ट झाल्याने पुढे ढकलण्यात आलेली एमपीएससीची परीक्षा पुन्हा एकदा घोळात सापडली आहे. १८ मे ला होणा-या या परीक्षेसाठी विद्यार्थ्यानी मागणी केलेली परीक्षा केंद्रे न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यामध्ये गोंधळाचे वातावरण असल्याचे निदर्शनास आले आहे. राज्य लोकसेवा आयोगामार्फत ७ एप्रिललाया परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु अचानक लोकसेवा आयोगाकडून परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्याचा डाटाच नाहीसा झाल्याने ही परीक्षा १८ मे रोजी आयोजित करण्यात आली होती. परीक्षा पुढे ढकलल्यामुळे निर्धास्त झालेले विद्यार्थी हॉल तिकिट हातात पडल्यानंतर मात्र पुन्हा गोंधळात पडले आहेत. नाशिकच्या अनेक विद्यार्थ्याना पुणे, मुंबई, अहमदनगर यासह राज्यातील अन्य शहरांमधील काही परीक्षा केंद्रे देण्यात आलेली आहेत. अर्ज भरताना नाशिक केंद्राची मागणी करुनही आयोगामार्फत ही चूक झाल्याचे संबंधित विद्यार्थ्यानी सांगितले. परीक्षेला केवळ दहा दिवस उरलेले असतानाच अचानकपणे केंद्र बदलल्याचे कळल्यामुळे विद्यार्थ्यामध्ये तणावाचे वातावरण आहे. याबाबत आयोगाशी संपर्क साधला असता हॉल तिकिटवर मिळालेल्या केंद्रावरच विद्यार्थ्यानी परीक्षा द्यावी लागेल असे सांगितले जात आहे. विद्यार्थ्यानी केन्द्र बदलून देण्याची मागणी केली असता आयोगाने नकार दिला आहे . यापूर्वी आयोजित केलेल्या परीक्षेचा डाटा नाहीसा झाल्यामुळे संबंधित परीक्षा जवळपास दीड महिना पुढे ढकलण्यात आली होती. या कालावधीत विद्यार्थ्यानी पुन्हा हे अर्ज भरुन सर्व प्रक्रिया पार पाडली. तरीही आयोगामार्फत परीक्षा केंद्राच्याबाबतीत ढिसाळपणे नियोजन केल्याचे दिसून येत आहे.
अभ्यास करा असा धोषा सगळेच जणं लावतात. परंतु, दहावी, बारावी आणि ग्रॅज्युएशन करताना त्या-त्या पातळीवर नेमक काय करायचं, याच्या थेट ११ टिप्स तुम्हांला देत आहेत.
मुलाखती मध्ये पुढील गोष्टी तपासल्या जातात.
१.बौद्धिक दक्षता (मेंटल अलर्टनेस) २.क्रिटिकल पॉवर ऑफ अॅसिमलेशन, समीक्षणात्मक दृष्टिकोनातून विचार आत्मसात करण्याची प्रवृत्ती. ३.स्पष्ट आणि तार्कीक स्पष्टीकरण. ४.परीक्षणातील समतोल. ५.छंद/आवड यामधील विविधता तसेच सखोलता. ६.सामाजिक दायित्व व समाजाभिमुखता. ७.बौद्धिक आणि नैतिक बांधिलकी. मोठमोठी स्वप्नं अनेक जण बघतात, मात्र ती पूर्ण कशी करायची, हे आपल्याला नेमक समजत नाही.त्यातून नैराश्य येतं. नैराश्यामुळे कमकुवतपणा येतो आणि एकटेपणाची भावना निर्माण होते. कुठलंही काम आपण एकाग्रतेने करू शकत नाही. नोकरदार असू, तर नोकरीच्या ठिकाणी जाण्याचं मन होत नाही, मात्र ऑफिसला जाण्याशिवाय पर्यायही नसतो. अशा वेळी सर्वप्रथम मनाची मरगळ दूर करायला हवी तरच आपलं स्वप्न, ईप्सित गाठता येणं शक्य आहे.यासाठी काय करता येईल ते पाहूया. गुन्हे अन्वेषणाचं काम करण्याची अनेकांची इच्छा असते. सी.बी.आय.मध्ये जाण्यासाठी काय करावं, याबद्दल माहिती जाणून घेण्याची उत्कंठा आपल्या मध्ये असते.
सी.बी.आय.ची स्थापना १९६३ मध्ये झाली. प्रामुख्याने आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचार, सरकारी नोकर व उच्चपदस्थांचा भ्रष्टाचार, दहशतवाद, बॉम्बस्फोट, माफिया, अंडरवल्र्ड आदी बाबींमध्ये तपास करण्याचं काम सी.बी.आय. करतं. सी.बी.आय.मध्ये विविध प्रकारे भरती केली जाते. |
Suresh Dindorkar
Author and Admin of this site was formerly P.S. to Union Minister, Govt of India , New Delhi Archives
September 2015
Categories
All
|